महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

ठाकरे, शरद पवारांनी असमान वागणूक दिली, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, केवळ काँग्रेसला इतक्या जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव

मुंबई- महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, यावर अखेरीस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेजकर यांनी भूमिका जाहीर केली आहे. आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी असमान वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आलाय. इतकंच नाही तर काँग्रेसला राज्यात सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्तावही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा अल्टिमेटम, संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..

मुंबई – वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मुंबईत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले, मात्र त्यांनी या सभेत भाजपावर हल्लाबोल करतानाच काँग्रेसलाही उपदेशाचे डोस पाजले. या सभेनंतर दिवस उलटला तरी अद्याप वंचित मविआसोबत आहे की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं आता महाविकास आघाडीनं […]

ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

इलेक्टोरल बाँड प्रकरणाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद? भाजपासह इंडिया आघाडीतील पक्षही अडचणीत? सुप्रीम कोर्टानं एसबीआयला काय दिलेत निर्देश?

नवी दिल्ली – इलेक्टोरल बाँड प्रकरणात सर्वाधिक निधी भाजपाला मिळालय आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र या बाँडचे लाभार्थी हे इतर राजकीय पक्षही आहेत. हे खंडणीचं रॅकेट असल्याचा आरोप करणाऱ्या इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या डीएमकेला मिळालेल्या 509 कोटींचा निधी वादात सापडलाय. लॉटरी किंग सँटियागो मार्टिनच्या फ्यूचर गेमिंगकडून हे 509 कोटी मिळाल्याचं समोर आलंय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, या सहा जागांवर अडलं जागावाटप, आंबेडकरांच्या निर्णयाकडंही लक्ष

मुंबई – लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या त्याला तीन दिवस उलटले, इंडिया आघाडीची पहिली प्रचाराची सभाही मुंबईत पार पडली, त्यालाही दोन दिवस उलटले. तरीही मविआतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. महाविकासा आघाडीच्या जागावाटपाचं काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मविआतच सहा जागांवर तिढा असल्याचं दिसतंय. त्यात वंचित आघाडीत येणार आणि त्यांना किती जागा मिळणार, यावरुन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआचं जागावाटप ठरलं? वंचितसह आणि वंचितशिवाय असे दोन पर्याय? काय आहे गणित?

मुंबई- राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेच्या समारोपाच्या निमित्तानं इंडिया आघाडीची एकजूट मुंबईत पाहायला मिळाली. काँग्रेससोबत इंडिया आघाडीत असलेले सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते शिवाजी पार्कवरच्या सभेत उपस्थित होते. मात्र या सगळ्यात वंचितच्या प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीकडं सगळ्यांचं विशेष लक्ष होतं. महाविकास आघाडीत सुरु असलेल्या जागावाटपाच्या चर्चांत वंचित नाराज आहे का, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, बैठकही होणार, रविवारी ऐतिहासिक सभा

मुंबई – भारत न्याय यात्रेचा ६२ दिवसांचा प्रवास करुन, राहुल गांधी आज मुंबईत पोहचतील. मणिपूरहून निघालेली ही यात्रा १४ राज्यांच्या प्रवास करुन मुंबईत दाखल होतेय. आज राहुल गांधी चैत्यभूमीवर जाणार आहेत. रविवारी शिवाजी पार्कात राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची समारोपाची सभा ऐतिहासिक होण्याची शक्यता आहे. या सभेत इंडिया आघाड़ीची एकजूट पाहायला मिळेल. इंडिया आघाडीतील १५ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआ जागावाटपाचा तिढा दोन जागांवर अडला, नेमकं काय घडलंय?

मुंबई- महाविकास आघाडीत जागावाटपाच्या फेऱ्या सुरु असल्या तरी अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. राहुल गांधी आज मुंबईत पोहचत आहेत, त्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत मविआच्या जागावाटपाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांना मात्र निमंत्रण देण्यात आले नव्हते. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले आणि त्यांनी पवारांशी चर्चा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का? 12 आमदार साथ सोडून ठाकरेंकडे परतणार? कुणी केला खळबळजनक दावा

चंद्रपुरात निर्भय बनोच्या सभेत त्यांनी हा दावा केलाय. इतकंच नाही तर त्यांनी या सभेत या 12 आमदारांची नावंही वाचून दाखवली आहेत.

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

Amit Shah: सीएए कायदा मागे घेणार नाही, अमित शाहांची ठाम भूमिका, ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आता राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. सीएए मागे घेततला जाणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी स्पष्ट केलंय. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील हिंदू, शिख, बौद्ध, ख्रिश्चन शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा असल्याचं त्यांनी सांगितलंय. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात २३ टक्के आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

भारत न्याय यात्रेमुळं काँग्रेस-मविआचं आत्मबल उंचावतंय? राहुल गांधींचा काय आहे लोकसभेचा अजेंडा? महाराष्ट्रात यात्रेचा काय परिणाम?

नाशिक- भारत न्याय यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र पिंजून काढत, काँग्रेसला नवसंजिवनी देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करताना दिसतायेत. नंदुरबारमधून राज्यात दाखल झालेली राहुल गांधींची भारत न्याय यात्रा धुळे, मालेगावचा टप्पा ओलांडत तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात प्रवेश करते आहे. या दौऱ्यात राहुल गांधी आज त्रंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शनही घेणार आहेत. या यात्रेदम्यान आदिवासी, महिला, शेतकरी, तरुण यांचे प्रश्न […]