महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘हाफकिनची एक इंचही जमीन विकली जाणार नाही’; तुकाराम मुंढेंकडे पुनरुज्जीवनाची जबाबदारी

Maharashtra Food and Drug Administration Minister Narhari Jhirwal addresses the Legislative Assembly while responding to questions on the revival of Hafkine Bio-Pharmaceutical Corporation in Mumbai.

मुंबई : १३५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे संस्थेच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाची सद्यस्थिती आणि त्याच्या संभाव्य खासगीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

उपप्रश्नांमध्ये भाजपचे अतुल भातखळकर यांनी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांनी संस्थेतील कथित गैरव्यवहारांवर ताशेरे ओढल्याचे निदर्शनास आणून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. काँग्रेसचे रईस शेख, भाजपचे योगेश सागर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे अजय चौधरी यांनीही संस्थेतील गैरव्यवहारांबाबत सरकारकडे स्पष्टीकरण मागितले.

उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, “हाफकिनची एक इंचही जमीन विकली जाणार नाही. तसेच संस्थेच्या खासगीकरणाचा सरकारचा कोणताही विचार नाही.”

संस्थेची आर्थिक आणि प्रशासकीय स्थिती सुधारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर चालविण्याचा पर्याय तपासण्यात आला होता. त्यासाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली; मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजकडून एकमेव अर्ज प्राप्त झाला. निविदा प्रक्रियेत एकच पात्र अर्ज प्राप्त झाल्यास ती प्रक्रिया ग्राह्य धरता येत नसल्याने पुढील कार्यवाही करण्यात आली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हाफकिनमधील कथित गैरव्यवहारांची तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही झिरवाळ यांनी दिली.

तसेच, डॉ. आर. ए. माशेलकर यांनी २०१७ मध्ये हाफकिनच्या पुनर्रचनेसंदर्भात सरकारला सादर केलेला अहवाल लवकरच विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात