ताज्या बातम्या महाराष्ट्र

नितीन गडकरींच्याविरोधात मोदी-शाह, फडणवीसांचा कट ; संजय राऊतांचा आरोप

मुंबई : लोकसभा निवडणूका अंतिम टप्यात आल्या असून निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे . भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), अमित शाह( Amit Shah)आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यांनी प्रयत्न केले आहेत ,असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे .त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .

केंद्रीय मंत्री अमित शहां यांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. त्यामुळे भाजपला उत्तरप्रदेशात मोठा धक्का बसणार आहे .त्याठिकाणी भाजपला ३० जागांचा फटका बसणार आहे .. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम ४ जूनला दिसेल.असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे . येत्या ४ जूननंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची राजवट याबाबत शंकांचं नाही . या लोकसभा निवडणुकीत या दोघांना सत्तेवरून दूर करण्यासाठीच देशातील जनतेने मतदान केले आहे , असेही राऊत म्हणाले आहेत .

या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आतापर्यंत मोदींना मतदान केले तो शेतकरी, कष्टकरीच मोदींच्या विरोधात उभा ठाकला. मोदी यांनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केले.त्यांनी देशात लोकशाहीलाच बंदिवान केलं आहे त्यामुळे त्यांचा पराभव होऊ शकत नाही असा भ्रम सगळीकडे पसरवला आहे . मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीचा महायुतीला जोरदार फटका बसणार आहे . या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या विरोधात फडणवीस यांनीच कट रचले हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात असे राऊत म्हणाले .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात