ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

8 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठीच्या अधिवेशनास आज वंदे मातरम आणि राज्य गीताने प्रारंभ झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ८ हजार ६०९ कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात मांडल्या. २७ फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. दुपारी दोन वाजता २०२४-२५ या वर्षाचा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री मांडतील‌. आज सभागृहात सादर झालेल्या ८ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘फसवणूक नको आरक्षण द्या’, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. ‘फसवणूक नको आरक्षण द्या’, ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Maratha Reservation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद

जालना मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यभरात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात पुढील १० तास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छं. संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

मुंबई आज राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज सकाळी ११ वाजता विधान परिषद तर दुपारी १२ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होणार आहे. अधिवेशन पुढील पाच दिवस चालणार आहे. उद्या २७ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. दुपारी दोन वाजता सन 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. अंतरिम अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2024 ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगे आंतरवालीत दाखल, मराठा बांधवांना घरी परतण्याचं आवाहन

जालना रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर थेट मुंबईला जायला निघाले होते. सलाईनमधून विष देऊन, एन्काऊंटर करुन किंवा उपोषणातून मला संपविण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. आपला बळीच घ्यायचा असेल तर आपणच फडणवीस यांच्या सागर बंगल्यात जाऊ आणि तेथे त्यांनी आपला बळी घ्यावा, सरकारने आपल्या बदनामीचं षडयंत्र रचल्याचा आरोप […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आमदार गणपत गायकवाडांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?

डोंबिवली : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल, याची सखोल चौकशी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी केलेल्या या भाष्यानं राज ठाकरेंचा रोख नेमका कुणाकडे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नांदेडचे 55 माजी नगरसेवक भाजपात, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

नांदेड नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या ५५ निर्वाचित व स्विकृत नगरसेवकांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. स्वतः चव्हाण यांनीच शनिवारी दुपारी समाजमाध्यमांवर फोटो आणि प्रतिक्रिया पोस्ट करून नांदेडच्या राजकारणातली ही मोठी बातमी समोर आणली. त्यानंतर विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी याविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, अशोक चव्हाण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारने महानंद आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबतचा कराराचा मसुदा सार्वत्रिक करण्याची किसान सभेची मागणी

मुंबई : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभा व राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवून सुद्धा राज्य सरकारने महानंदा एन.डी.डी.बी.ला चालवायला देण्याच्या बद्दलच्या हालचाली तीव्र केल्याचं सांगितलं जात आहे. महानंदाच्या सर्व संचालकांनी राजीनामा दिला असून महानंदाबाबत एन.डी.डी.बी. म्हणजे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबत करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे राज्य सरकारचे मंत्रीच जाहीररित्या सांगत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘अडचणीच्या काळात शरद पवारांना छत्रपती शिवरायांची आठवण, आता तुतारी मिळालीय तर…’, काय म्हणाले राज ठाकरे?

कल्याण : शरद पवारांनी आत्तापर्यंतच्या राजकारणात कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही, मात्र आता अडचणीच्या काळात त्यांना रायगडावर जाऊन तुतारी फुंकावी लागते आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत शरद पवारांवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं बंड झालं. पक्षाचा ताबा अजित पवारांना मिळाला, पक्षाचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आंदोलकांची उद्या निर्णायक बैठक, दुपारपर्यंत रास्तारोको नंतर धरणे आंदोलन

जालना आज गावागावत होणारं रास्ता रोकोचं रुपांतर धरणे आंदोलनात करा, असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. नाशिकमध्ये बंजारा समाजाचा मोठा कार्यक्रम आहे. त्यामुळे रास्ता रोको न करता गावांत धरणे आंदोलन करण्याचं आवाहन मराठा बांधवांना करण्यात आलं आहे. त्याशिवाय मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांना अडचण नको म्हणून आंदोलनात बदल करण्यात आल्याचं जरांगे […]