महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

‘राहुल गांधी यांची शिवाजी पार्कातील सभा म्हणजे हास्यजत्रा’, भाजपाच्या मोठ्या नेत्याची टीका, उद्धव ठाकरेंनाही चॅलेंज

नागपूर– राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेच्या समारोपाची शिवाजी पार्कात पार पडलेली सभा म्हणजे हास्यजत्रा होती, अशी टीका भाजपानं केलीय. राहुल गांधी यांचं भाषण लोकांना कळलं नाही, अनेक जणं सभा सोडून निघून गेले, ५० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या, अशी टीकाही करण्यात येतेय. राहुल यांचं भाषण म्हणजे हास्यजत्रा होती अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

उद्धव ठाकरेंवरही निशाणा

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात जमलेल्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो अशी होत असते. मात्र कालच्या सभेत त्यांनी हिंदू शब्द टाळला. यावरुन राहुल गांधींना ते शरण गेलेयेत. हेच स्पष्ट होतंय. असंही बावनकुळे म्हणालेत.

उद्धव ठाकरेंना आव्हान

उद्धव ठाकरेंचं हसू येतं, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावून तुमचे १८ खासदार २०१९ च्या लोकसभेला निवडून आलेत. यावेळी तुम्ही १८ खासदार निवडून दाखवाच असं आव्हानही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. शरद पवार हे देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी कधी हमीभावाचा, पीक विम्याचा विचार केला नाही, असंही बावनकुळे म्हणालेत. बारामतीच्या बाहेर फिरता येत नाही. तुम्ही एका परिवारात, मतदारसंघात अडकले आहात, तुम्ही मोदींशी बरोबरी कशी कराल, असा चिमटाही बावनकुळेंनी काढलाय.

हेही वाचाः‘अल्पसंख्याक’ची व्याख्या देशाचं विभाजन करणारी, घटनेतील व्याख्येचा पुनर्विचार व्हावा, काय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी?

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात