ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याण -डोंबिवलीत अहंकार, गद्दारी , पैशांची मस्ती चालणार नाही ; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरीही महायुतीमध्ये अजूनही सर्व जागांवर उमेदवारी जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघात अजून उमदेवार ठरलेला नाही . यावरूनही बोलताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा धरला आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सातारा मतदारसंघात उमदेवारी कोणाच्या गळ्यात ? श्रीनिवास पाटील यांची मुलाला उमेदवारी देण्याची मागणी

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde )यांच्या नावावर शरद पवार (Sharad Pawar )गटांकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसलेल्या श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil )यांनी आता आपल्या मुलासाठी म्हणजे सारंग पाटील यांच्यासाठी (Sarang Shriniwas Patil)आग्रही मागणी केल्याने ही उमेदवारी कोणाच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमरावतीच्या नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; जात प्रमाणपत्र वैध

मुंबई : लोकसभेच्या तोंडावर जात वैधता प्रमाणपत्राबाबत अडचणीत सापडलेल्या अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे .याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) त्यांच्या जात प्रमाणपत्रावर शिक्कामोर्तब झाला आहे.न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं याप्रकरणी निकाल दिला आहे . याआधी मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधींनी वायनाडमध्ये इंडिया आघाडीतील मित्रपक्षाविरोधात शड्डू ठोकला; यंदाची निवडणूक किती कठीण?

वायनाड : काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित जागा म्हणून केरळमधील वायनाड मतदारसंघाकडे पाहिले जाते. यंदाही राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या मतदारसंघातून राहुल गांधींनी इंडिया आघाडीतील मित्रपक्षाविरोधात शड्डू ठोकला आहे. उत्तर भारतात काँग्रेसकडून इंडिया आघाडी एकजूट राहण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे दक्षिण भारतात मात्र इंडिया आघाडीला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचं स्पष्ट […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय निरुपम यांचा काँग्रेसला रामराम ; लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करणार

मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam)यांनी पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . त्यानंतर आज त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम केला आहे . यासंबधीची पोस्ट देखील सोशल मिडीयीवर शेअर केली आहे. त्यामुळे आता पुढे त्यांची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे . गेल्या काही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मुख्यमंत्री त्यांच्या मुलाची उमेदवारीही जाहीर करु शकत नाहीत, भाजपाचा इतका दबाव’, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याची घणाघाती टीका

नागपूर – महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाचा मोठा दबाव असल्यानं मुख्यमंत्री स्वताच्या मुलाची उमेदवारीही जाहीर करु शकत नाहीत, अशी घणाघाती टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. सध्या लोकसभेच्या जागेसाठी त्यांच्या हक्काच्या १३ जागा जर ते मिळवू शकत नसतील, तर विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देण्यात येतील, असा सवालही जाधव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ ; बोगस जात प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आज निकाल

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Kaur Rana)यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत आज सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court)वतीने निकाल दिला जाणार आहे . याकडे अमरावतीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापर होतोय? भाजपात येणाऱ्यांची आकडेवारी काय सांगते?

मुंबई– नरेंद्र मोदी यांचं सरकार २०१४ साली सत्तेत आल्यापासून देशभरात भ्रष्टाचारविरोधी मोहिमेनं वेग घेतलाय. अनेक नेत्यांच्या विरोधात ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवाया होण्यास सुरुवात झाली. ना खाऊंगा, ना खाने दुंगा हे नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य चांगलंच गाजलंही. मात्र काळ जात गेला तसतसा या कारवाया केवळ काँग्रेस आणि विरोधी पक्षांवरच होतायेत का, असा सवाल निर्माण होऊ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मातोश्रीवर मिळालेला सन्मान हेमंत पाटलांना पचवता आला नाही ; अंबादास दानवेंची टीका

मुंबई : लोकसभेच्या तोंडावर हिंगोली लोकसभा मतदारसंघात (Hingoli Lok Sabha)राजकीय घडामोडीना वेग आला आहे . या मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपच्या दबावामुळे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Sriram Pati) यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे . तसेच यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारीचा पत्ता कट करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

32 टक्के मराठा समाजाच्या मतांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून!

X : @milindmane70 मुंबई: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) अपक्ष उमेदवार द्यायचे नाहीत, अशी घेतलेली भूमिका, तसेच कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभांना मराठ्यांनी जायचे नाही, ज्याने – त्याने आपला निर्णय घ्यायचा, ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला मते द्यायची त्याला द्या, पण ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही त्यांचा कार्यक्रम मात्र […]