महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahayuti candidates : महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार? दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

X: @therajkaran

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार असून पहिला टप्प्याचे मतदान 17 एप्रिलला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता महिनाही शिल्लक राहिलेला नाही. परंतु, महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आता महायुतीतील (Mahayuti) जागा वाटपाचा तिढा हा दिल्लीतून सोडवला जाणार आहे. दिल्लीत आज भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत महायुतीची बैठक पार पडणार आहे. यासाठी महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (Ajit Pawar Group) अशा तिन्ही पक्षातील प्रमुख नेते हे दिल्लीला जाणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे प्रमुख नेते अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील जागा वाटपावर चर्चा करण्यात येणार आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या बहुतांश जागांवर एकमत झाले असले तरी काही जागांबाबत अद्यापही तिढा कायम आहे. ज्यामुळे याबाबत आता थेट दिल्लीत चर्चा करण्यात येणार आहे. अमित शहा जागा वाटपाच्या चर्चेत मध्यस्थी करून हा तिढा सोडवणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या भेटीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजपाकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये त्यांनी एकूण 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे 48 पैकी 20 लोकसभा मतदारसंघात भाजपा (BJP) उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता उरलेल्या 28 जागांबाबत कसा निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, 28 पैकी महायुतीत 12 लोकसभा मतदारसंघाबाबतचा कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे या 12 जागांचा तिढा सोडवण्यासाठी भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी दिल्लीत महायुतीची बैठक बोलावली असल्याचे आता सांगण्यात येत आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात