मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकार विरोधी वक्तव्य “बोलघेवडे” बावनकुळे यांच्या आले अंगाशी

Twitter : @vivekbhavsar

मुंबई

भारतीय जनता पक्षाविरोधात काहीही छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर घेऊन जा, असे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. पत्रकार संघटनांनी ‘बोलघेवडे’ बावनकुळे यांचा निषेध केलाच आहे, त्याशिवाय विरोधी पक्षदेखील बावनकुळे यांच्यावर तुटून पडले आहेत.

विदर्भातील इतर मागासवर्गीय तेली समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे भाजपला जवळपास 13 जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता. बावनकुळे हे नितीन गडकरी यांच्या कॅम्पमधले म्हणून ओळखले जातात. भाजपने झालेली चूक दुरुस्त करताना बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष केले, तेव्हा भाजपपासून दूर गेलेला ओबीसी समाज पुन्हा पक्षाकडे वळवता येईल, असा वरिष्ठांचा कयास होता. मात्र सुरुवातीपासूनच बावनकुळे हे त्यांच्या वाचाळपणामुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. 

भाजप नेत्यांनी यापूर्वी ‘चाय बिस्कुटवाले पत्रकार’ अशी जाहीर टीका केली होती. त्यावेळी भाजपमधील ‘दुय्यम’ फळीतील नेते आघाडीवर होते. आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीच पत्रकारांना ‘चहासाठी बोलवा, ढाब्यावर न्या आणि 2024 च्या निवडणुकीपर्यंत आपल्या विरोधात बातमी लागणार नाही याची काळजी घ्या.’ असा सल्लाच नगरमधील भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. 

या संदर्भातील क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर आणि स्थानिक वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, मनसे पदाधिकारी नीलेश भोसले यांनी बावनकुळेंवर टीकेची झोड उठवली आहे.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने बावनकुळे यांचा निषेध करतानाच त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

बावनकुळे यांच्या व्यक्तव्यामुळे संपूर्ण भाजपा बॅकफुटवर गेली. तरीही त्यांच्या समर्थनार्थ भाजप महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ पुढे सरसावल्या. बावनकुळे व्यंगात्मक बोलले, असा दावा करून चित्रा वाघ विरोधकांवरच घसरल्या. दरम्यान, दिवसभरामध्ये बावनकुळे यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नव्हती.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात